महामाया निळावंती
महामाया निळावंती आपल्याला कोणतीही एखादी गोष्ट हवी असेल किंवा काही साध्य करायचं असेल, तर त्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. फार मेहनत केली, तर त्याची चांगली फळं मिळतात. पण मेहनत ही आलीच. ‘अगर तुम किसी चीझ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है,‘ हा ‘ओम शांती ओम’मधला डायलॉग संपूर्ण खरा नाही. काही अंशीच तो प्रत्यक्षात येऊ शकतो. असाध्य ते साध्य करण्यासाठी लागते, ती दुर्दम्य इच्छाशक्ती. ही नेमकी कशाशी खातात, ते जाणून घ्यायचं असेल, तर सुमेध लिखित निळावंती वाचायला पाहिजे. पण एक गोष्ट आधीच सांगतो, की या कादंबरीमध्ये जी इच्छाशक्ती आहे, ती चांगली नाही. ती सर्वनाशाकडे घेऊन जाणारी आहे, हेही तितकंच खरं आहे. निळावंती या कादंबरीबद्दल बऱ्याच लोकांनी लिहिलेलं वाचलं होतं. म्हणजे अर्थातच कौतुक. कारण ही एक रहस्य उलगडणारी कादंबरी आहे. ४०० वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या जंगलात राहणाऱ्या निळावंतीशी बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली आणि नंतर तिचा खून केला. या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तर...