पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर

इमेज
वरवरचे नव्हे; खोलवरचे वधू-वर गेल्या काही वर्षांपासून लग्न जमणं आणि मग ते टिकवणं हे एक टास्क झालं आहे. आता मात्र लग्न जमणं हेच एक टास्क आहे. मुला-मुलींची वयं वाढत जातात आणि मग लग्न जुळवणं ही त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरच्यांची, विशेषतः आयांची डोकेदुखी होऊन बसते. मग ही मुलं-मुली वेगवेगळ्या आयडिया काढतात. काही वेळा त्यातून इगो जपला जातो; पण सुख मिळेलच याची शाश्वती नसते. असे काही उपाय करून झाल्यावर किंवा कोणाचे तरी ऐकून/बघून झाल्यावर एक रिअलायझेशन होतं आणि तेच महत्त्वाचं ठरणारं असतं, असं माझं मत आहे. ‘वरवरचे वधूवर’ या दोन अंकी नाटकाची थीम हीच आहे. नाटकाची सुरुवात होते, तीच फोर्थ वॉल मोडून. नायिका विशाखा (सखी गोखले) मंचावर येते, तेव्हाच कळतं, की हे काही नेहमीसारखं नाही. काही तरी वेगळं घडणार आहे. समजायला आणि उच्चारायला अतिशय क्लिष्ट असं तिचं प्रोफेशन असतं. नाटकातला नायक मोहितचंही (सुव्रत जोशी) तेच प्रोफेशन असतं. आता कसंय... मालिकांमध्ये नायक नायिका भेटणार हे आपल्याला माहिती असतं. पण ते कसे भेटणार आणि गोष्टीचा शेवट होण्यापूर्वी त्यांच्यात काय गोष्ट घडणार याची आपल्याला उत्सुकता असत...